Maharashtracha Geography| संपूर्ण भूगोल सराव प्रश्न संच | | By AIMS STUDY CENTER

संपूर्ण भूगोल सराव प्रश्न संच (SAMPURNA BHUGOL SARAV PRASHNAPATRIKA SANCH)

Geography_questions
                                                            Indian Geography Questions


आज आपण भूगोल बद्दल काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. यामध्ये भूगोल आणि महाराष्ट्रातील काही महत्वाचे जिल्हे ज्यामध्ये साक्षरता,राष्ट्रीय महामार्ग, तेथील महत्वाचे ठिकाण, नद्या, धार्मिक स्थळे इत्यादी. भूगोल प्रश्नोत्तरे वाचून मित्रांना पाठवा आणि दररोज भेट देण्यास विसरू नका.

प्र.१ कोल्हापूर जिल्हाबद्दल खालीलपैकी योग्य माहिती ओळखा.
अ) लोकसंख्या : 3876001
ब) साक्षरता दर : 81.51%
क) तालुके : 12
ड) नगरपालिका : 13

पर्याय
१) अ , ब
२) अ,ब,आणि क
३) अ,ब,क आणि ड✓✓
४) अ,ड

प्र २. महाराष्ट्रातील विभाग त्या विभागातील जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.

'अ' गट                         'ब' गट

अ) कोकण                  I ) पाच
ब) औरंगाबाद             II ) सात
क) नागपूर                  III ) सहा
ड) पुणे                       IV ) आठ

पर्याय:
१) अ - II, ब - IV, क - III ), ड - I ✓✓
२) अ - II, २) ब - I, ३) क - III ) ४) ड - IV
३) अ - III , २) ब - IV, ३) क - II ) ४) ड - I
४) अ - II, २) ब -IV, ३) क -III ) ४) ड - I

प्र. ३. महाराष्ट्रातील विभाग त्या विभागातील जिल्हे यांची अयोग्य जोडी ओळखा.

'अ' गट                               'ब' गट

अ) कोकण                    I ) सात
ब) औरंगाबाद                II ) आठ
क) नागपूर                    III ) सहा
ड) पुणे                          IV) सात✓✓

प्र.४ बंदरांबद्दल योग्य असलेले पर्याय ओळखा.

अ) मूंबई हे नैसर्गिक बंदर आहे.
ब) मूंबई जवळ नाव्हा-सेवा हे नवीन बंदर निर्माण केले.
क) महाराष्ट्रात एकूण ४९ बंदरे आहेत.
ड) मुंबईच्या दक्षिणेस सात बंदरे आहेत.

पर्याय :
१) अ, ब
२) अ,ब,आणि क
३) अ,ड
४) अ,ड, क आणि ड✓✓
स्पष्टीकरण : अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण आणि वेंगुर्ला

प्र. ५. कोकण किनार पट्टीबद्दल अचूक असलेले विधाने ओळखा.
अ) अरबी समुद्राच्या सखल भागात खलाटी असे म्हणतात.
ब) पूर्वेकडील ढोंगराळ भागाला वळाटी असे म्हणतात.
क) कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे.
ड) वरीलपैकी सर्व बरोबर✓✓

प्र. ६. नाशिक जिल्ह्याबद्दल खालीलपैकी बरोबर नसलेला पर्याय ओळखा.

अ) राष्ट्रीय महामार्ग: 2, NH-3 आणि NH-50 हा शहरातून जातो.
ब) जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण: 82.31% आहे.
क) जिल्हयाचे स्त्री लिंग गुणोत्तर : 934 स्त्रिया प्रति हजार पुरुष मागे आहे.
ड) गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन उगम पावते.

पर्याय
१) अ , ब
२) अ,ब,आणि क
३) अ,ब, आणि ड
४) वरीलपैकी सर्व बरोबर✓✓

प्र.७. सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल योग्य नसलेला पर्याय ओळखा.
अ) सिंधुदुर्ग हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते.
ब) कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ आहे.
क) आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
ड) प्रमुख नद्या – वाघोटन, देवगड ,कर्ली ,गडनदी ,तिलारी व तेरेखोल या सहा मोठ्या नद्या आहेत.

पर्याय
१) अ , ब
२) अ,ब,आणि क
३) अ,ब, आणि ड
४) अ,ब,क आणि ड✓✓

भूगोल प्रश्नोत्तरे वाचून मित्रांना पाठवा आणि दररोज भेट देण्यास विसरू नका.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

If You have Doubts, Please Let Me Know