Aurangabad District | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती मराठी
Aurangabad District
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती पाहत असताना औरंगाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराला 25 दरवाजांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. औरंगाबाद हा मराठवाड्यातील महत्वाचा ज़िल्हा असून या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यालयाचे खंडपीठ, जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या, बीबीका मकबरा , पाणचक्की, थत्तेहौद , दौलताबादचा देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, जायकवाडी धरण, पैठण-शालिवाहन राज्याची राजधानी, खाम नदी आणि गौताळा अभयारण्य इत्यादी ऐतिहासिक वारसांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा ढोबळ मानाने औरंगाबाद जिल्ह्याचा परिचय झाला.
औरंगाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? बऱ्याचदा आपण औरंगाबाद जिल्ह्याचा उल्लेख खडकी असा देखील ऐकला असेल. त्याविषयी थोड्याक्यात आपण इतिहास जाणून घेऊ या. सन 1610 मध्ये निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने हे शहर खडकी या नावाने स्थापन केले. पुढे मलिक अंबर चा मुलगा फतेह खान याने शहराचे खडकी हे नाव बदलून फतेहनगर असे नामकरण केले. पुढे सन 1653 मध्ये औरंगजेबने फतेहनगरचे औरंगाबाद असे नामकरण करून औरंगाबाद शहराला राजधानी म्हणून घोषित केले.
इतिहास: 1604 मध्ये अहमदनगरचा निजामशाह मुर्तुझा द्वितीय यांचा सरदार मलिक अंबर याने औरंगाबाद शहर वसवले असा इतिहास आहे.सन 1633 मध्ये मुघलांनी निजामशाहीचा पराभव करून फतेहनगरवर ताबा मिळविला. सन 1653 मध्ये औरंगजेब फतेहनगरचे औरंगाबाद असे नामकरण करून औरंगाबाद शहराला राजधानी म्हणून घोषित केले.
छत्रपती संभाजीनगरमधील एकूण 52 दरवाज्यांपैकी काही दरवाजे सध्या अस्तित्वात असून काही दरवाजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 14 नहरी बांधल्या त्यातील दोन नहरी अजून चालू आहेत.औरंगजेब त्याच्या मृत्युपर्यंत औरंगाबाद येथेच राहिला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर औरंगाबाद शहर, हैदराबाद निजामाच्या राजवटीत सामिल झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद हे निजामाकडून मुक्त झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा हा विभाग हैदराबाद राज्यातुन तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन झाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके यादी: औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री , वैजापूर, सिल्लोड, सोयगाव
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे स्थान व विस्तार: औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला जळगाव जिल्हा आहे. तसेच पूर्वेला जालना जिल्हा असून दक्षिणेला बीड व नगर जिल्हा तसेच पश्चिमेला नाशिक हा जिल्हा आहे. भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण भाग लाव्हा पासून बनलेला आहे. दख्खन पठार हा बेसल्टिक लाव्हापासून निर्माण झालेले एकमेव ही मोठी भौगोलिक निर्मिती आहे.
एकूण भौगोलिक क्षेत्रफळ: 10,130.89 चौ.कि.मी असून भौगोलिक दृष्टया औरंगाबाद जिल्ह्याची दक्षिणेकडील भागाची सरासरी उंची 600-660 मीटर आहे. उत्तरेडकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळुन येतो. औरंगाबाद जिल्ह्याचा हिवाळा साधारणत ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्याच्या दरम्यान असतो तर उन्हाळा मार्च ते मे दरम्यान असतो. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी 725.85 मिमी पाऊस पडतो. औरंगाबाद शहराचे तापमान श्रेणी 6 ते 46 डिग्री अंश सेल्सिअस दरम्यान असते. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाळी हंगाम जून ते सप्टेंबर दरम्यान असतो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्वाचे पर्वत खालीलप्रमाणे:
1) अंतूर -827 मी
2) सतोंडा - 552 मी
3) अब्बासगड -671 मी
4) अजिंठा 578 मीटर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या: औरंगाबाद जिल्ह्याचा लोकसंख्येच्या बाबतीत विचार केल्यास भारतीय लोकसंख्या जनगणना-2011 नुसार औरंगाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 37.01 लाख एवढी आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी 43.8% लोकसंख्या शहरी भागात व 45.2% लोकसंख्या ग्रामीण भागात आढळून येते. औरंगाबाद जिल्ह्यातील पुरुष:महिला प्रमाण:1000:923 एवढे आहे. तर महाराष्ट्र राज्याचे पुरुष:महिला प्रमाण:1000:929 एवढे आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण 79% असून यामध्ये पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण 87.4% आहे तर महिलांचे साक्षरतेचे प्रमाण 70.1% एवढे आहे.
प्रमुख मार्ग: NH -211
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:
१. अजंठा - वेरूळ लेण्या: 5व्या - 8व्या शतकात गुफेत साकारलेल्या लेण्या
२. दौलताबाद किल्ला: मोहम्मद तुघलकाची राजधानी
३. खुलताबाद: मुघल बादशहा औरंगजेबाची कबर
४. बीबी का मकबरा: हे 1660 मध्ये औरंगजेबचा मुलगा आझम शहा यांनी आपल्या आईची [बेगम राबीयाची(बादशहा औरंगजेबाच्या पत्नीची)] आठवण म्हणून बांधलेले कबर आहे.
५. घृष्णेश्वर मंदीर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक (बारावे ज्योतिर्लिंग)
६. पाणचक्की
७. पैठण: संत एकनाथ यांचे गाव
८. जायकवाडी धरण: नाथसागर (जायकवाडी धरण पक्षी अभयारण्य )
९. औरंगाबाद गुफा आणि औरंगाबाद लेणी: (युनेस्कोने इ.स.1983 साली जागतिक वारसा घोषित)
१०. म्हैसमाळ: थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद येथे आहे.
जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्याची घोषणा केली.
थंड हवेचे ठिकाण: म्हैसमाळ
उद्योग: छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या ठिकाणी तसेच पैठण तालुक्यात औद्योगिक वसाहती आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहत ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. चिकलठाणा येथे एक आय.टी.पार्क आहे.
प्रमुख पीके: कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू
प्रमुख नद्या: गोदावरी, तापी, पूर्णा
ऐतिहासिक शहर पैठण: पैठण हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालीवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. इ.स. 1312 च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं. पैठणने जगास अनेक नररत्ने दिली जसे की, शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्तेश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे, राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो.
छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्यातील महत्वाचा ज़िल्हा असून या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यालयाचे खंडपीठ, जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या, बीबीका मकबरा, पाणचक्की, थत्तेहौद , दौलताबादचा देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, जायकवाडी धरण, पैठण- शालिवाहन राज्याची राजधानी, खाम नदी, गौताळा अभयारण्य, इत्यादी बद्दल माहिती आपण थोड्यात बघितली आहे. कोणत्या स्पर्धा परीक्षेत औरंगाबाद विषयी एकदा तरी प्रश्न येण्याचे दाट शक्यता असते. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा हा कोणत्याही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे असे समजून आपण घ्याल.
सर्व माहिती आपण शेवट पर्यंत वाचली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. Thank You!
थंड हवेचे ठिकाण: म्हैसमाळ
उद्योग: छत्रपती संभाजीनगर तालुक्यात वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या ठिकाणी तसेच पैठण तालुक्यात औद्योगिक वसाहती आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहत ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. चिकलठाणा येथे एक आय.टी.पार्क आहे.
प्रमुख पीके: कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू
प्रमुख नद्या: गोदावरी, तापी, पूर्णा
ऐतिहासिक शहर पैठण: पैठण हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालीवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. इ.स. 1312 च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं. पैठणने जगास अनेक नररत्ने दिली जसे की, शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्तेश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे, राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो.
छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्यातील महत्वाचा ज़िल्हा असून या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यालयाचे खंडपीठ, जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या, बीबीका मकबरा, पाणचक्की, थत्तेहौद , दौलताबादचा देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, जायकवाडी धरण, पैठण- शालिवाहन राज्याची राजधानी, खाम नदी, गौताळा अभयारण्य, इत्यादी बद्दल माहिती आपण थोड्यात बघितली आहे. कोणत्या स्पर्धा परीक्षेत औरंगाबाद विषयी एकदा तरी प्रश्न येण्याचे दाट शक्यता असते. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा हा कोणत्याही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे असे समजून आपण घ्याल.
सर्व माहिती आपण शेवट पर्यंत वाचली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. Thank You!
Post a Comment
If You have Doubts, Please Let Me Know